प्रिय अवनी,
काल तुला गोळ्या घालून मारण्यात आल्याचं कळालं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.किती निर्दयी लोकं असतील ती?तू त्यावेळेस किती विव्हळली असशील...तू माणसांना खातेस,१३लोकांना तू तुझं भक्ष्य बनवलस आणि २५ गावात तुझी दहशत होती,असे त्यांनी तुझ्यावर आरोप लावलेत. क्रूरतेच्या साऱ्या सीमा पार केलेल्या लोकांना तुझ्यावर गोळ्या झाडताना आणि रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या तुला कसं बघवल गेलं असेल?हा सगळा विचार करतानाच मला सुन्न व्हायला झालंय.
तू काल गेलीस म्हणून काही संवेदनशील व आस्था वाटणाऱ्या लोकांकडून तुझ्याविषयी सोशल मीडियावरून हळहळ व्यक्त केली जात आहे,पण तिथेच तुझ्या दहशतीच्या गर्तेत अडकलेल्या लोकांकडून फटाके उडवून त्यांनी सुटकेचा आनंद साजरा केला.तेव्हा कीव करावीशी वाटली मला त्या लोकांची आणि त्यांच्या गोठलेल्या भावनांची.तुला मारण्यासाठी कित्येक कर्मचारी,हत्ती,शार्पशूटर, पिंजऱ्याची जमवाजमव केली होती.full planned होतं ते सगळंच! तू 'वाघीण' होतीस म्हणून तुझी दहशत होती.तू बोकड असतीस तर तुझेच लचके याच लोकांनी तोडून,मसाला मारून पार मिटक्या मारत खाल्ले असते.
एकीकडे हेच लोक वाघ वाचावे म्हणून मोहिम्या आखतात,वाघांची संख्या कमी झाली म्हणून चर्चा करतात आणि दुसरीकडे याच लोकांनी तुझी हत्या करताना मागे पुढे देखील पाहिले नाही.तू लोकांचे बळी घेतलेस याचे दुःख आहेच,पण दोष पूर्णपणे तुझाही नाही.तुझ्या निवासाचे ठिकाण असणाऱ्या जांगलावरही यांचा डोळा आहे म्हणल्यावर तू तरी काय करणार? अवनी,तुझे जरा चुकलेच पण तुझ्या चुकीसाठी आमच्या जगतात कुठलेही न्यायालय नाही की शिक्षेची तरतूद नाही;नाहीतर तूही जबाब देऊ शकली असतीस.तुला जन्मठेप झाली असती,मग कसेतरी तू तुझे दिवस रखडले असतेस.निदान आत्ता अचानक मायेचे छत्र हरवल्याप्रमाणे तुझे बछडे पोरके तरी झाले नसते.मग तू परत तुझ्या राज्यात परतली असतीस.पण ते राज्य तरी आत्ता कुठं नीट राहिलय,तीही मनुष्यवस्तीच बनत चालली आहे.या लोकांना कळत नाहीये हे त्यांच्या कृतीने तुमचा आणि पर्यायाने अापलासुद्धा आधीवास धोक्यात आणत आहेत.
इकडचा न्याय आणि कायदा जरा वेगळा आहे.इथे हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्याला फाशीची शिक्षा होऊनही ते वर्षानुवर्षे जगतात.काय करणार?कायदेच माणसांच्या सोयीने बनवले आहेत.जर यांनाही गोळ्या घालून असे संपवता आले असते तर दहशतीच्या मार्गावर चालणारे सुद्धा शांततेत जगले असते.असो,तू गेलीस पण मागे एक विचार करायला लावणारा प्रश्न देऊन गेलीस,जो प्रत्येकाच्या डोक्यात दहशत पसरवेल एखाद्या वाघिणीप्रमाणेच...!
तुझीच बछडी,
अदिती.
Saturday, 13 March 2021
अवनी...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
वाफाळलेल्या पत्रातून...
प्रिय जन्म, प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भ...
-
आजकाल माझ्या मनात सतत घोंगावत राहणारा एकच प्रश्न आहे,खरंच आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे? आजकाल आम्हा विद्यार्थ्यांवर टीकेचा चौफेर ...
-
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा एक तरी 'कट्टा' नक्कीच असतो. जिथे तो आपले एक एक क्षण मनमुरादपणे जगत असतो. जिथं त्याने मजा...
-
जेव्हापासून खिडकीत बसायला झालंय तेव्हापासून मी वेगळ्याच विश्वात रममाण होत चालली आहे.जराशी उसंत मिळाली की खिडकीची दारे मला आपसुकच...
1 comment:
Wahhhhhhh!
Post a Comment