Saturday, 13 March 2021

गोल्डन डेज...!

         प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा एक तरी 'कट्टा' नक्कीच  असतो. जिथे तो आपले एक एक क्षण मनमुरादपणे जगत असतो. जिथं त्याने मजा- मस्ती, टिंगटवाळी, भांडा -भांडी, रुसवेफुगवे,यश -अपयश या सर्वांची भेळ मिसळ चाखलेली असते.असाच एक कट्टा माझ्याही आयुष्यात नकळत आला आणि कधी त्या कट्ट्याची एवढी सवय होऊन गेली हे माझे मला देखील कळले नाही.
           हो!असा 'कट्टा' माझ्या आयुष्यात आहे आणि मला तो कायम माझ्या आठवणीत राहील,तो म्हणाजे "NSS कट्टा"national service scheme असा त्याचा fullform. राष्ट्राची सेवा करण्या हेतूने आपल्या माणसांनी बांधलेला हा कट्टा.या कट्ट्यावर मला मित्र मैत्रिणी कमीच पण भवा बहिणीची नाती जोपासणारी माणसे भेटली. कॉलेजमध्ये पाऊल पडताच माझी पाऊले आपसूकच कत्त्याकडे वळतात.कट्टा तसा निर्जीव, सिमेंट विटांनी बांधलेला,पण आमच्यात नवतरुण्याचे चैतन्य निर्माण करण्याचं काम तो अगदीच चोख करतो.
           आज कोण जाणे त्या 'कट्ट्याची' खूप आठवण येत आहे.एनएसएस मध्ये प्रवेश घेतला तेव्हा इतर जण या कट्ट्यावर तासनतास गप्पा टाकताना दिसत.तेव्हा नकळत एक प्रश्न डोकावयचा,यांना काही कामे नाहीत का,किती वेळ इथे बसतात?पण आता मला कळून चुकले आहे की या कट्ट्यात नक्कीच एक मॅजिक आहे जे लोकांना एकमेकांशी कनेक्टेड ठेवते.एक 
माझ्या जीवनातील अविभाज्य भाग बनेल असा मी विचारही केला नव्हता.
              पिंपळाच्या छायेत उभा असणारा हा कट्टा प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे.एनएसएस मध्ये श्रमदानाचे काम झाल्यावर आम्हाला विसवण्यास जागा देणारा तूच.कारण आमच्या एनएसएस चे ब्रीदवाक्य आहे 'Not me but you'. या कट्ट्यावर आम्ही सर्वांनी राडा घातला.कारण तसा आमचा मोटो आहे,"No compromise only rada."त्यामुळे राडा घालणं हा आमचा स्थायीभाव बनला नसून ती आमची गरज बनली आहे.
            कट्ट्याचा संबंध तसा अनेकाशी म्हणजेच अनोळखी नात्यांशी जोडला गेला आहे.काही अनोळखी नाती ही रक्त्याच्या नात्यापेक्षा जवळची बनू शकतात याची जाणीव कट्ट्याने करून दिली.तो माझ्या आणि या नवीन बनलेल्या नात्यातील दुवा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.एक कट्टा आपल्याला इतक्या गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो याची. मी कल्पना ही केली नव्हती.बोलताना किती क्षुल्लक वाटते कट्टा पण ज्याने या कट्ट्यावर दिवस घालवले त्यालाच त्याची किंमत कळेल.नात्यांचे घट्ट वीण बांधायला ज्याने शिकवले त्याची तुलना आणि किंमत करणे वेडेपणाचे ठरेल. कट्ट्याने मला काय काय दिले तर मला हसायला शिकवले,सतत आनंदी राहण्याचे बळ दिले, दुसऱ्याशी नाते जपायला, वेळप्रसंगी मदत करायला,किती धावायचे अन् कुठे थांबायचे या सगळ्यांचा गुरु हा एकच '"कट्टा".इतकं सार शिकवलं पण सार विनामोबदला, निःस्वार्थी भावनेने.
             आज हे सारे लिहिताना माझे मन भूतकाळात डोकावत आहे. कट्ट्यावर घालवलेल्या रम्य आठवणीत गिरक्या घालत आहे.खरे सांगायचे तर या कट्ट्यावर मी माझे मोजकेच पण आनंदी क्षण जगले.कट्ट्याची आणि माझी मैत्री तशी केवळ सात महिन्यांची पण सात जन्म लक्षात राहील एवढी ताजी.कधीही न कोमेजणारी.या कट्ट्यावर आम्ही एकमेकांचे बर्थ डे साजरे केले.मग त्यात एकमेकांना केक फासणे, भरवणे असो, सेल्फी मध्ये आपण स्वतः दिसण्यासाठी केली जाणारी धडपड असो, नाहीतर भेळ आणि समोश्याची केलेली पार्टी असो,या सगळ्याच गोष्टी आपल्या अदृश्य कॅमेऱ्याने हा कट्टा सगळे कॅप्चर करत असेल असे माझे मन मला सांगते. कट्ट्यावर कधी कोणाचे बिनसले तर कधी प्रेम फुलले.कधी कोणी इथे चहाडी केली तर कधी चेष्टा तर कधी अगदीच गंभीर गोष्टी बोलल्या गेल्या.पण त्या नेहमीच माझ्यासाठी secrets राहतील.कारण आमचा कट्टा फक्त ऐकतो बोलत मात्र काहीच नाही. लेक्चर्स बंक करून तासनतास खिळवून ठेवण्याची क्षमता या कट्ट्यात आहे. तिथेच आम्ही आमचे projects journals assignment पूर्ण केल्या. कट्ट्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कट्टा कधी हसला,रडला,तर कधी रागावला, चिडला आणि विचारातही पडला नसेल का?कट्ट्याने तर आमची पथनाट्यची प्रॅक्टीस ही बघितली  आणि तेथे घडणाऱ्या गमतीजमतीवर तो खळ खळून हसला देखील असेल.आमचे यशानंतरचे कट्ट्यावर उभे राहून केलेले सेलिब्रेशन आणि अपयशानंतर आमच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याचे वजनही "तू" पेलवले.नवीन कल्पना, विचारसरणी, योजना या तुझ्याभोवती बसूनच तर आखल्या गेल्या.इतकचं काय पण पाणी टाकीजवळ केलेली पाणी उडवा उडवीची मौज तूही नाही विसरणार याची मला खात्री वाटते.कट्टा  हा मला नक्कीच निर्जीव वाटत नाही.कारण निर्जीव गोष्ट कशी काय मला नवऊर्जा,उत्साह,जगण्याचे बळ,इच्छा आकांक्षा,स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द,प्रेरणा,दिशा या सर्वाची शिदोरी देऊ शकते?
                न राहवून एक विचार सतत येतो कट्ट्याची आठवण आज जशी मला येत आहे तशीच त्या कट्ट्यास आमची आठवण येत नसेल का?"कट्टा" हा माझ्या आयुष्याच्या लघुपटाचा दिग्दर्शक आहे. त्याच्या दिग्दर्शन करण्याच्या पद्ध्द ती बदलतील पण तो कधीच बदलणार नाही. कट्याच मला नेहमीच अप्रूप वाटत,कारण तो कधी उपकाराची भाषा बोलत नाही.सुखदुःखाने विणलेले सुखद क्षण मला या कट्ट्याने दिले.परत परत आठवावे असे पण न विसरण्यासारखे असे कट्टयाने काही शिल्लकच ठेवले नाही.आज मला मनोमन पटले आहे,माझ्या आयुष्यात जेव्हाही माझ्या flashback मध्ये रमेन त्यातली अतिशय सुखावणारी आणि नेहमीच प्रेरणा देणारी गोष्ट ही कट्टाच असेल.थोड्या दिवसांत आपला परस्पर दर्शी असलेला संबंध संपुष्टात येईल पण आपले मनोमन जोडलेले नाते हे फुलपाखराप्रमाणे सतत माझ्या समोर उडताना मला दिसेल.अस म्हंटल जात की'हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टीची साथ ही एका मर्यादेपर्यंत असते.आपलेही काहीसे तसेच आहे आपली भेटण्याची मर्यादा संपेल पण विचारांची,प्रेमाची नव्हे.तुझे माझ्यावर आणि माझे तुझ्यावर असणारे प्रेम हे नक्कीच चिरंतन स्मरणात राहिल आणि प्रत्येकवेळी माझ्या डोळ्यातून आलेल्या आनंदाश्रूचा "तू" साक्षी असशील.
                                                   -aditi malekar

2 comments:

Kamalakar Shivalingappa Ruge said...

A writer has good command language . Keep it up and go ahead

अदिती मळेकर said...

Thank you...

वाफाळलेल्या पत्रातून...

प्रिय जन्म,               प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भ...